२५ जून २००९-मुंबई वृत्तान्त-पान १
एकटा जीव’ हाऊसफुल्ल! सातव्या आवृत्तीचे आज राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
प्रतिनिधी
मराठी रंगभूमीवर ‘विच्छा माझी पुरी करा’या नाटकाद्वारे नवा इतिहास घडविणाऱ्या आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वत:ची शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या ‘एकटा जीव’ आत्मचरित्रालाही वाचकांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद लाभतो आहे. उद्या २५ जून रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे.
चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या अनिता पाध्ये यांनी दादांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्राचे शब्दांकन केले असून पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. त्यानंतरच्या चार आणि गुरुवारी प्रकाशित होणाऱ्या सर्व आवृत्त्या अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. मुंबईत होणारा हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ मिमिक्री कलाकार सुदेश भोसले हे दादांच्या काही आठवणी सांगणार असून दादांच्या आवाजात या पुस्तकातील काही भागाचे वाचनही करणार आहेत.
पुस्तकाची पहिली आवृत्ती १२ मार्च १९९९ रोजी तर दुसरी आवृत्ती अवघ्या एका महिन्यांत म्हणजे ४ एप्रिल १९९९ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर हे पुस्तक न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईच्या कचाटय़ात सापडले होते. न्यायालयाकडून या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. मात्र पाध्ये यांनी न्यायालयीन कचाटय़ातून २००० मध्ये हे पुस्तक सोडवले. त्यामुळे पुस्तकावरील बंदी उठली. नंतर त्याच वर्षी पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. पुढे दर वर्षी एक या प्रमाणे एकेक आवृत्ती येत राहिली. दादांचे आयुष्य हे विविध नाटय़पूर्ण घटनांनी भरलेले होते. या पुस्तकात त्यांच्या या सर्व आयुष्याचा पट उलगडला गेला आहे. हे आत्मचरित्र असूनही दादांनी आपल्या आयुष्यात जे काही घडले त्यापैकी काहीही न लपवता सर्व काही प्रश्नंजळपणाने सांगितले आहे. आपल्यातील गुण-दोषांसकट त्यांनी स्वत:ला वाचकांपुढे सादर केले असून त्यांचे हे प्रश्नंजळपण दादांच्या चाहत्यांसकट सर्व वाचक आणि रसिकांना भावल्यामुळेच दहा वर्षात पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत असल्याचे पाध्ये यांनी ‘वृत्तान्त’शी बोलतांना सांगितले.
चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करत असल्यामुळे दादा कोंडके यांच्याशी परिचय होताच. या पुस्तक लेखनाच्या निमित्ताने तो अधिक जास्त जवळून झाला. पुस्तकाचे लेखन करण्यापूर्वी मी जवळपास अकरा महिने दररोज दादांशी बोलून सर्व माहिती घेत होते. दुपारी ४ ते रात्री ९ अशी वेळेत आमच्या गप्पा व्हायच्या. आमचे हे सर्व बोलणे ध्वनिमुद्रीत केलेले असून त्याच्या ८० कॅसेट्स माझ्याकडे आहेत. दादांशी बोलून सर्व माहिती घेऊन झाल्यानंतर तीन महिन्यांत मी पुस्तक लेखनाचे काम केले. पुस्तकाचे लेखन हे दादांच्या शैलीतच केले असल्याचे त्या म्हणाल्या.
हिंदी आणि गुजराथी भाषेत या पुस्तकाच्या भाषांतर/अनुवादासाठी विचारणा करण्यात आली आहे, मात्र त्याबद्दल अद्याप विचार केला नसल्याचे पाध्ये म्हणाल्या.
Thursday, June 25, 2009
Tuesday, June 23, 2009
पंढरीची वारी पोहोचली जगभरी
पंढरीची वारी पोहोचली जगभरी!
मुंबई, २२ जून /प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अव्यातपणे सुरु असलेली पंढरीची वारी म्हणजे भक्तीचा अनोखा अविष्कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या वारीमध्ये विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित मंडळी आणि इंटरनेटसॅव्ही व ‘आयटी’ क्षेत्रातील युवकही सहभागी होत आहेत. दरवर्षी पंढरीच्या वारीत सहभागी होणारी ही लाखो माणसे उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अशाच उत्सुकतेतून आणि आपण घेतलेल्या वारीचा अनुभव लोकांपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने छायाचित्रकार शिरीष शेटे यांनी ‘वारी-पाथ टू दि डिवाइन’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असल्यामुळे पंढरीची वारी आता जगभर पोहोचणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर पुण्यात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते झाले. शेटे हे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेत मुख्य फोटोग्राफर आहेत. गेली पाच ते सहा वर्षे ते वारी करत आहेत. या पुस्तकात त्यांनी वारीचे अनुभव छायाचित्रे आणि लेखन या स्वरुपात सादर केले आहेत. वारीची परंपरा व इतिहास, वारीची होणारी सुरुवात, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या वारीतील पालख्यांचा सहभाग, दिवेघाटातील वारीचा प्रवास यासह वारीच्या प्रवासातील महत्वाचे मुक्काम, अकलूज व वाखरी येथे होणारे वारीतील रिंगण तसेच अन्य महत्वाच्या नोंदींची सुमारे २०० रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक ‘स्पेन्टा प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.
‘वारी’ या विषयावर मराठीमध्ये बरेच लेखन प्रकाशित झाले असून इंग्रजी भाषेत मात्र या विषयावर फारसे लेखन नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचा हा ठेवा मराठी भाषिकांखेरीज अन्य भाषिकांपर्यत तसेच जगभरात पोहोचावा, या उद्देशाने आपण हे लेखन इंग्रजीतून केले असल्याचे शेटे यांनी सांगितले.
मुंबई, २२ जून /प्रतिनिधी
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अव्यातपणे सुरु असलेली पंढरीची वारी म्हणजे भक्तीचा अनोखा अविष्कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या वारीमध्ये विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित मंडळी आणि इंटरनेटसॅव्ही व ‘आयटी’ क्षेत्रातील युवकही सहभागी होत आहेत. दरवर्षी पंढरीच्या वारीत सहभागी होणारी ही लाखो माणसे उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अशाच उत्सुकतेतून आणि आपण घेतलेल्या वारीचा अनुभव लोकांपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने छायाचित्रकार शिरीष शेटे यांनी ‘वारी-पाथ टू दि डिवाइन’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असल्यामुळे पंढरीची वारी आता जगभर पोहोचणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर पुण्यात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते झाले. शेटे हे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेत मुख्य फोटोग्राफर आहेत. गेली पाच ते सहा वर्षे ते वारी करत आहेत. या पुस्तकात त्यांनी वारीचे अनुभव छायाचित्रे आणि लेखन या स्वरुपात सादर केले आहेत. वारीची परंपरा व इतिहास, वारीची होणारी सुरुवात, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या वारीतील पालख्यांचा सहभाग, दिवेघाटातील वारीचा प्रवास यासह वारीच्या प्रवासातील महत्वाचे मुक्काम, अकलूज व वाखरी येथे होणारे वारीतील रिंगण तसेच अन्य महत्वाच्या नोंदींची सुमारे २०० रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक ‘स्पेन्टा प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.
‘वारी’ या विषयावर मराठीमध्ये बरेच लेखन प्रकाशित झाले असून इंग्रजी भाषेत मात्र या विषयावर फारसे लेखन नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचा हा ठेवा मराठी भाषिकांखेरीज अन्य भाषिकांपर्यत तसेच जगभरात पोहोचावा, या उद्देशाने आपण हे लेखन इंग्रजीतून केले असल्याचे शेटे यांनी सांगितले.
Tuesday, June 16, 2009
तुकोबांच्या अभंगांवरून
तुकोबांच्या अभंगावरून महात्माजींना स्फूरली तीन माकडांची गोष्ट!
शेखर जोशी
मुंबई, १६ जून
महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देत असतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते.
महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये,
पापाची वासना नको दावू डोळा
त्याहूनी आंधळा बराच मी
निंदेचे श्रवण नको माझे कानी
बधीर करोनी ठेवी देवा
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा
त्याहूनी मुका बराच मी
नको मज कधी परस्त्रीसंगती
जनातून माती उठता भली
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा
तू ऐक गोपाळा आवडीसी
हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते.
एका अंत्ययात्रेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली.
संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे. येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे. या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नाही.
शेखर जोशी
मुंबई, १६ जून
महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देत असतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते.
महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये,
पापाची वासना नको दावू डोळा
त्याहूनी आंधळा बराच मी
निंदेचे श्रवण नको माझे कानी
बधीर करोनी ठेवी देवा
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा
त्याहूनी मुका बराच मी
नको मज कधी परस्त्रीसंगती
जनातून माती उठता भली
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा
तू ऐक गोपाळा आवडीसी
हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते.
एका अंत्ययात्रेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली.
संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे. येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे. या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नाही.
Sunday, June 14, 2009
महापालिका सज्ज
महापालिका सज्ज
शेखर जोशी
मान्सून अद्याप मुंबई आणि परिसरात दाखल झाला नसला तरी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर उद्भवणाऱ्या पूरपरिस्थीतीला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. अतिवृष्टी झाली तर करावयाच्या उपाययोजनांबरोबरच सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जी खबरदारी घेणे आवश्यक असते, त्यासाठीही पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणी असलेल्या बंदिस्त व उघडय़ा गटारांतून आणि नाल्यांतून गाळ बाहेर काढण्यात आला आहे. मिठी, पोयसर, ओशिवरा आदी नद्यांमधील गाळ काढण्यात आला आहे. तसेच संरक्षक भिंत बांधणे व अन्य कामे करण्यात आली आहेत. हाजीअली, लव्हग्रोव्ह, इर्ला नाला आदी पातमुखांच्या ठिकाणी पाणी उपसा करणारे अधिक क्षमतेचे उदंचन संच बसविण्यात आले आहेत. रस्त्यावर असलेल्या गटारांची स्वच्छता करण्यासाठी ३५ यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर येथील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या कार्यशाळेत गाळ उपसणारे १२ फायरेक्स, ९ सक्शन, ३ जेटिंग व २ सक्शन कम जेटिंग मशीन्स ठेवण्यात आली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी एक फायरेस्क मशीन ‘एन-पूर्व’ व ‘के-पूर्व’ विभागात ठेवण्यात आली आहे.
अतिवृष्टी झाली तर शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साठते. शहर विभागात पांडुरंग बुधकर मार्ग, ताडदेव, संत गाडगे महाराज चौक-सातरस्ता, करी रोड रेल्वे स्थानक व ना. म. जोशी मार्ग, वरळी नाका, गणपतराव कदम मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग, हिंदूमाता चित्रपटगृह, काळाचौकी तसेच पूर्व व पश्चिम उपनगरात अनुक्रमे अंधेरी सब वे, नवरंग चित्रपटगृह, मीलन सब वे, सहार मार्ग चौक, बंदरकर वाडी, अमृतनगर, वैशाली नगर, मोतीलाल नगर, ठाकूर संकुल, प्रताप नगर, कोकण नगर, लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग, गव्हाणपाडा गावठाण, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळचा परिसर, सुमन नगर, स्वस्तिक चेंबर्स, नेहरू नगर आदी ठिकाणी पावसाचे पाणी साठण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी पालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच सखल भागात पावसाचे साठलेले पाणी बाहेर उपसून टाकण्यासाठी १९३ ठिकाणी २११ पंप बसविण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने आपत्कालिन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून पालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांशी ११ हॉटलाइन येथे जोडण्यात आलेल्या आहेत. आपत्कालिन प्रसंगी नागरिकांना १०८ व १९१६ या क्रमांकांवर थेट संपर्क साधावा. प्रशासनातर्फे गेल्या काही वर्षापासून हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मदत घेण्यात येत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दूरध्वनी किंवा मोबाइल सेवा बंद पडली तर हॅम रेडिओच्या मदतीने मदत करणे व संपर्क साधणे शक्य होते. पालिकेचे २४ प्रशासकीय विभाग त्याद्वारे जोडण्यात आले आहेत. पालिकेच्या नियंत्रण कक्षात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
पालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील अग्निशमन केंद्रांच्या इमारतींवर तसेच पालिका मुख्यालय व काही विभाग कार्यालयांवर ३५ स्वयंचलित हवामानदर्शक व पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. तेथे पडणाऱ्या पावसाची नोंद २४ तास करण्यात येणार असून आपत्कालिन प्रसंगी कोणत्या विभागात किती पाऊस झाला, कोणत्या विभागात पावसाचा जोर वाढत आहे त्याची माहिती अवघ्या १५ मिनिटात पालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात १५ मिनिटांत २० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
पालिलकेच्या २४ विभाग कार्यालयांतही २० मे २००९ पासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. सर्व विभाग कार्यालयात दोन जेसीबी व एक डंपर आणि २४ तास कर्मचारी वर्ग ठेवण्यात येणार आहे. ज्या विभागात पाणी साठण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप व कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील पाच महापालिका शाळांमध्ये तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निशमन दलही आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाले आहे. वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर, मरोळ आणि बोरिवली येथे प्रश्नदेशिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी बोटी, फ्लोटिंग स्टेचर, जीवरक्षक जॅकेट्स, रेस्क्यू टय़ूब्स आणि अन्य साधनसामग्री व पुरेसे कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
पालिका प्रशासनाने पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी केली असली तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. मुंबई व परिसरात कधी एकदा पाऊस सुरू होतोय, त्याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारण पाऊस पडला तर त्याला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. परंतु २६ जुलै २००५ साररखी अतिवृष्टी झाली तर मुंबईत पाणी साठणारच, ते रोखणे शक्य नाही. तरीही अशा आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करून पूरपरिस्थितीला तोंड देईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
महापालिका मुख्य नियंत्रण कक्ष-१०८, १९१६, २२६९४७२५, २२६९४७२७, २२६९४७११ (फॅक्स)
पोलीस नियंत्रण कक्ष-१००, २२६२००८१, २२६२१८५५
अग्निशमन नियंत्रण कक्ष-१०१, २३०८५९९१, २३०८५९९२ ते ९४.
हवामान विभाग-२२१५०४३१
पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्ष-२२०१७४२०
मध्य रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
कोकण रेल्वे नियंत्रण कक्ष-२७५७९९६९
रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
राज्य पोलीस नियंत्रण कक्ष-२२०२६५६६
एमएमआरडीए नियंत्रण कक्ष-२६५९४१९०
‘बेस्ट’ वाहतूक नियंत्रण कक्ष, वडाळा-२४१४३६११, २४१३६८८३, २४१३७६४५, २४१४६१६२
शेखर जोशी
मान्सून अद्याप मुंबई आणि परिसरात दाखल झाला नसला तरी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर उद्भवणाऱ्या पूरपरिस्थीतीला तोंड देण्यासाठी महापालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. अतिवृष्टी झाली तर करावयाच्या उपाययोजनांबरोबरच सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जी खबरदारी घेणे आवश्यक असते, त्यासाठीही पालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणी असलेल्या बंदिस्त व उघडय़ा गटारांतून आणि नाल्यांतून गाळ बाहेर काढण्यात आला आहे. मिठी, पोयसर, ओशिवरा आदी नद्यांमधील गाळ काढण्यात आला आहे. तसेच संरक्षक भिंत बांधणे व अन्य कामे करण्यात आली आहेत. हाजीअली, लव्हग्रोव्ह, इर्ला नाला आदी पातमुखांच्या ठिकाणी पाणी उपसा करणारे अधिक क्षमतेचे उदंचन संच बसविण्यात आले आहेत. रस्त्यावर असलेल्या गटारांची स्वच्छता करण्यासाठी ३५ यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर येथील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या कार्यशाळेत गाळ उपसणारे १२ फायरेक्स, ९ सक्शन, ३ जेटिंग व २ सक्शन कम जेटिंग मशीन्स ठेवण्यात आली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी एक फायरेस्क मशीन ‘एन-पूर्व’ व ‘के-पूर्व’ विभागात ठेवण्यात आली आहे.
अतिवृष्टी झाली तर शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साठते. शहर विभागात पांडुरंग बुधकर मार्ग, ताडदेव, संत गाडगे महाराज चौक-सातरस्ता, करी रोड रेल्वे स्थानक व ना. म. जोशी मार्ग, वरळी नाका, गणपतराव कदम मार्ग, डॉ. ई. मोझेस मार्ग, हिंदूमाता चित्रपटगृह, काळाचौकी तसेच पूर्व व पश्चिम उपनगरात अनुक्रमे अंधेरी सब वे, नवरंग चित्रपटगृह, मीलन सब वे, सहार मार्ग चौक, बंदरकर वाडी, अमृतनगर, वैशाली नगर, मोतीलाल नगर, ठाकूर संकुल, प्रताप नगर, कोकण नगर, लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग, गव्हाणपाडा गावठाण, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळचा परिसर, सुमन नगर, स्वस्तिक चेंबर्स, नेहरू नगर आदी ठिकाणी पावसाचे पाणी साठण्याची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी पालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. तसेच सखल भागात पावसाचे साठलेले पाणी बाहेर उपसून टाकण्यासाठी १९३ ठिकाणी २११ पंप बसविण्यात आले आहेत. पालिका प्रशासनाने आपत्कालिन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून पालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांशी ११ हॉटलाइन येथे जोडण्यात आलेल्या आहेत. आपत्कालिन प्रसंगी नागरिकांना १०८ व १९१६ या क्रमांकांवर थेट संपर्क साधावा. प्रशासनातर्फे गेल्या काही वर्षापासून हॅम रेडिओ ऑपरेटर्सची मदत घेण्यात येत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दूरध्वनी किंवा मोबाइल सेवा बंद पडली तर हॅम रेडिओच्या मदतीने मदत करणे व संपर्क साधणे शक्य होते. पालिकेचे २४ प्रशासकीय विभाग त्याद्वारे जोडण्यात आले आहेत. पालिकेच्या नियंत्रण कक्षात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
पालिकेने मुंबई शहर आणि उपनगरातील अग्निशमन केंद्रांच्या इमारतींवर तसेच पालिका मुख्यालय व काही विभाग कार्यालयांवर ३५ स्वयंचलित हवामानदर्शक व पर्जन्यमापक यंत्रे बसवली आहेत. तेथे पडणाऱ्या पावसाची नोंद २४ तास करण्यात येणार असून आपत्कालिन प्रसंगी कोणत्या विभागात किती पाऊस झाला, कोणत्या विभागात पावसाचा जोर वाढत आहे त्याची माहिती अवघ्या १५ मिनिटात पालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात १५ मिनिटांत २० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सूचना देऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
पालिलकेच्या २४ विभाग कार्यालयांतही २० मे २००९ पासून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. सर्व विभाग कार्यालयात दोन जेसीबी व एक डंपर आणि २४ तास कर्मचारी वर्ग ठेवण्यात येणार आहे. ज्या विभागात पाणी साठण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप व कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील पाच महापालिका शाळांमध्ये तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली आहे.
अग्निशमन दलही आपत्कालीन परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज झाले आहे. वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर, मरोळ आणि बोरिवली येथे प्रश्नदेशिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी बोटी, फ्लोटिंग स्टेचर, जीवरक्षक जॅकेट्स, रेस्क्यू टय़ूब्स आणि अन्य साधनसामग्री व पुरेसे कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
पालिका प्रशासनाने पावसाळ्यात पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी केली असली तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. मुंबई व परिसरात कधी एकदा पाऊस सुरू होतोय, त्याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारण पाऊस पडला तर त्याला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. परंतु २६ जुलै २००५ साररखी अतिवृष्टी झाली तर मुंबईत पाणी साठणारच, ते रोखणे शक्य नाही. तरीही अशा आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करून पूरपरिस्थितीला तोंड देईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक
महापालिका मुख्य नियंत्रण कक्ष-१०८, १९१६, २२६९४७२५, २२६९४७२७, २२६९४७११ (फॅक्स)
पोलीस नियंत्रण कक्ष-१००, २२६२००८१, २२६२१८५५
अग्निशमन नियंत्रण कक्ष-१०१, २३०८५९९१, २३०८५९९२ ते ९४.
हवामान विभाग-२२१५०४३१
पश्चिम रेल्वे नियंत्रण कक्ष-२२०१७४२०
मध्य रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
कोकण रेल्वे नियंत्रण कक्ष-२७५७९९६९
रेल्वे नियंत्रण कक्ष-२३०८१७२५
राज्य पोलीस नियंत्रण कक्ष-२२०२६५६६
एमएमआरडीए नियंत्रण कक्ष-२६५९४१९०
‘बेस्ट’ वाहतूक नियंत्रण कक्ष, वडाळा-२४१४३६११, २४१३६८८३, २४१३७६४५, २४१४६१६२
Thursday, June 11, 2009
मनपा करणार औषधी झाडांची लागवड
महापालिका करणार औषधी झाडांची लागवड
प्रतिनिधी
मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आणि पर्यावरणाला पोषक ठरतील, अशा आयुर्वेदिक झाडांची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्याचा निर्धार बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला आहे. पावसाळ्यात एक रुपया इतके नाममात्र शुल्क घेऊन मुंबईकरांना रोपांचे वाटप करण्यात येणार असून यंदा एक लाख रोपांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक व महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
२००९-१० या आर्थिक वर्षासाठी वृक्ष प्रश्नधिकरणासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, गृहनिर्माण संस्था तसेच अन्य ठिकाणी अडुळसा, नागकेशर, कोरफड, तुळस, आवळा, हिडा, बेहडा, आदी औषधी झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाकडून १० कोटी रुपयांची मदत मागण्यात आली आहे, असे आयुक्त म्हणाले.
मुंबईत दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. ती झाडे विशेष करून मोकळ्या जागी लावण्यात यावीत, रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात येऊ नयेत. कारण येथे लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण कमी आहे. झाडे वाढली तरी नंतर ती कापावी लागतात. झाडे आणि पक्षी यांचा परस्पर संबंध असून पालिकेने ‘हरित क्षेत्रा’तील झाडांवर पक्ष्यांसाठी निवारे बांधावेत, अशी सूचना महापौरांनी या वेळी केली.
मुंबईत १९ लाख १७ हजार झाडे अस्तित्वात असून गेल्या पाच वर्षात झाडांच्या संख्येत सात लाखांनी वाढ झाली आहे. मुंबईत दोन लाख ४१ हजार अशोकाची, एक लाख ७४ हजार नारळाची, एक लाख आठ हजार आंब्याची तर एक लाख ५९ हजार सुबाभुळाची झाडे असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी या वेळी दिली.
जाहिरातीचे फलक लावण्यासाठी अनेकदा झाडांची कत्तल केली जाते, अशी कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही महापौरांनी या वेळी केली. महापालिका यंदा पावसाळ्यात रोपांचे वाटप करणार आहे. या रोपांबरोबर पालिकेने नाममात्र शुल्क आकारून खत व मातीही द्यावी, अशी सूचना महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष कुमार पांडे यांनी या वेळी प्रशासनाला केली.
प्रतिनिधी
मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आणि पर्यावरणाला पोषक ठरतील, अशा आयुर्वेदिक झाडांची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्याचा निर्धार बृहन्मुंबई महानगरपालिकेने केला आहे. पावसाळ्यात एक रुपया इतके नाममात्र शुल्क घेऊन मुंबईकरांना रोपांचे वाटप करण्यात येणार असून यंदा एक लाख रोपांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक व महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
२००९-१० या आर्थिक वर्षासाठी वृक्ष प्रश्नधिकरणासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील मोकळ्या जागा, गृहनिर्माण संस्था तसेच अन्य ठिकाणी अडुळसा, नागकेशर, कोरफड, तुळस, आवळा, हिडा, बेहडा, आदी औषधी झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाकडून १० कोटी रुपयांची मदत मागण्यात आली आहे, असे आयुक्त म्हणाले.
मुंबईत दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. ती झाडे विशेष करून मोकळ्या जागी लावण्यात यावीत, रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात येऊ नयेत. कारण येथे लावलेली झाडे जगण्याचे प्रमाण कमी आहे. झाडे वाढली तरी नंतर ती कापावी लागतात. झाडे आणि पक्षी यांचा परस्पर संबंध असून पालिकेने ‘हरित क्षेत्रा’तील झाडांवर पक्ष्यांसाठी निवारे बांधावेत, अशी सूचना महापौरांनी या वेळी केली.
मुंबईत १९ लाख १७ हजार झाडे अस्तित्वात असून गेल्या पाच वर्षात झाडांच्या संख्येत सात लाखांनी वाढ झाली आहे. मुंबईत दोन लाख ४१ हजार अशोकाची, एक लाख ७४ हजार नारळाची, एक लाख आठ हजार आंब्याची तर एक लाख ५९ हजार सुबाभुळाची झाडे असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी या वेळी दिली.
जाहिरातीचे फलक लावण्यासाठी अनेकदा झाडांची कत्तल केली जाते, अशी कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही महापौरांनी या वेळी केली. महापालिका यंदा पावसाळ्यात रोपांचे वाटप करणार आहे. या रोपांबरोबर पालिकेने नाममात्र शुल्क आकारून खत व मातीही द्यावी, अशी सूचना महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष कुमार पांडे यांनी या वेळी प्रशासनाला केली.
आणखी पाणीकपात
पाऊस लांबल्यास मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात?
प्रतिनिधी
मान्सून अद्यापही मुंबईत दाखल झालेला नसल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने बुधवारपासून मुंबई आणि उपनगरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आणखी काही दिवस पाऊस मुंबईत दाखल झाला नाही तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. महापालिकेत पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात जून महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल, इतका पाणीसाठा शिल्लक असून खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईत मान्सून दाखल कधी होतोय त्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. पुढील आठवडय़ातही पाऊस दाखल झाला नाही तर आणखी १० ते १५ टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पाणीकपात १५ ते २५ टक्के होईल. मात्र याबाबत पुढील आठवडय़ातच निर्णय घेण्यात येणार आहे.
‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ पालिकेचे अभियान
प्रतिनिधी
नुकत्याच साजऱ्या झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात ‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी ‘वृक्षारोपण आणि पातळ प्लास्टिकपासून सर्व नागरिकांचा बचाव’ या विषयावर जनजागृती मोहिम आयोजित केली होती. ग्लोबल वॉर्मिगचा धोका आणि मुंबईत विविध मार्गाने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही राजीव यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे, असे राजीव यांनी सांगितले.
प्रतिनिधी
मान्सून अद्यापही मुंबईत दाखल झालेला नसल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने बुधवारपासून मुंबई आणि उपनगरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आणखी काही दिवस पाऊस मुंबईत दाखल झाला नाही तर मुंबईकरांना आणखी पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. महापालिकेत पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात जून महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल, इतका पाणीसाठा शिल्लक असून खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने सध्या १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईत मान्सून दाखल कधी होतोय त्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. पुढील आठवडय़ातही पाऊस दाखल झाला नाही तर आणखी १० ते १५ टक्के पाणीकपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पाणीकपात १५ ते २५ टक्के होईल. मात्र याबाबत पुढील आठवडय़ातच निर्णय घेण्यात येणार आहे.
‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ पालिकेचे अभियान
प्रतिनिधी
नुकत्याच साजऱ्या झालेल्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेतर्फे पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात ‘निसर्गाकडून निसर्गाकडे’ या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी ‘वृक्षारोपण आणि पातळ प्लास्टिकपासून सर्व नागरिकांचा बचाव’ या विषयावर जनजागृती मोहिम आयोजित केली होती. ग्लोबल वॉर्मिगचा धोका आणि मुंबईत विविध मार्गाने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही राजीव यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्याची मोहीम महापालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे, असे राजीव यांनी सांगितले.
Thursday, June 4, 2009
मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण
मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण!
‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ पुस्तकाचे अभिवाचन सुरू
शेखर जोशी
खासगी दूरदर्शन वाहिन्या आणि संगणक-इंटरनेटच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड करण्यात येत असते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी निवडक मराठी साहित्य याच दूरचित्रवाहिन्यांवरून मालिकांच्या स्वरुपात सादर झाल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली आहे. असेच काम आकाशवाणीनेही गेल्या काही वर्षांत केले आहे. मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण मिळाल्यामुळे अनेक चांगली मराठी पुस्तके आकाशवाणीच्या खेडोपाडी पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहेत.
आकाशवाणीच्या मुंबई आणि पुणे केंद्रावरून सध्या डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाचे अभिवाचन सुरू झाले आहे. अमेरिकास्थित उद्योजक-व्यावसायिक असलेले डॉ. ठाणेदार यांच्या या पुस्तकाच्या गेल्या तीन-चार वर्षांत वीसहून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. दर बुधवारी सकाळी ७-४० वाजता त्याचे प्रसारण होत असून २७ भागात या पुस्तकाचे अभिवाचन केले जाणार आहे.
आकाशवाणीच्या मुंबई (ब) केंद्रावरून म्हणजे आत्ताच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरुन गेल्या काही वर्षांपासून मराठीतील निवडक पुस्तकांच्या अभिवाचनाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला व्यावसायिक स्वरुप देण्याचे आणि पुस्तकांचे वाचनमहामालिका स्वरुपात सादर करण्याचे श्रेय आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश केळुस्कर यांना जाते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे २५ पुस्तकांवर अभिवाचनाच्या मालिका सादर केल्या आहेत. यात धनुर्धारी (वाईकर भटजी), डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आणि आम्ही) गोडसे भटजी (माझा प्रवास), मधु मंगेश कर्णिक (लागेबांधे), प्रल्हाद चेंदवणकर (टाच) आणि अन्य काही पुस्तकांचा समावेश आहे.
विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील ‘महानायक’ या कादंबरीच्या अभिवाचनाची महामालिका खूप गाजली. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील अनेक नामवंत या अभिवाचनात सहभागी झाले होते. या मालिकेचे २५५ भाग सादर झाले व या मालिकेने आकाशवाणीलाही सुमारे २५ लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला होता.
आकाशवाणीवर एखाद्या पुस्तकावरील अभिवाचन सादर झाले की वाचकांमध्ये तसेच साहित्यप्रेमींमध्ये त्या पुस्तकाची चर्चा होऊन सार्वजनिक किंवा खासगी ग्रंथालयातून त्या पुस्तकाला मागणी येते, पुस्तकाची विक्री वाढते, असा अनुभव आहे. मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांसाठीही त्याचा चांगला उपयोग झाला असल्याचे डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले.
‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ पुस्तकाचे अभिवाचन सुरू
शेखर जोशी
खासगी दूरदर्शन वाहिन्या आणि संगणक-इंटरनेटच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड करण्यात येत असते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी निवडक मराठी साहित्य याच दूरचित्रवाहिन्यांवरून मालिकांच्या स्वरुपात सादर झाल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली आहे. असेच काम आकाशवाणीनेही गेल्या काही वर्षांत केले आहे. मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण मिळाल्यामुळे अनेक चांगली मराठी पुस्तके आकाशवाणीच्या खेडोपाडी पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहेत.
आकाशवाणीच्या मुंबई आणि पुणे केंद्रावरून सध्या डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाचे अभिवाचन सुरू झाले आहे. अमेरिकास्थित उद्योजक-व्यावसायिक असलेले डॉ. ठाणेदार यांच्या या पुस्तकाच्या गेल्या तीन-चार वर्षांत वीसहून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. दर बुधवारी सकाळी ७-४० वाजता त्याचे प्रसारण होत असून २७ भागात या पुस्तकाचे अभिवाचन केले जाणार आहे.
आकाशवाणीच्या मुंबई (ब) केंद्रावरून म्हणजे आत्ताच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरुन गेल्या काही वर्षांपासून मराठीतील निवडक पुस्तकांच्या अभिवाचनाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला व्यावसायिक स्वरुप देण्याचे आणि पुस्तकांचे वाचनमहामालिका स्वरुपात सादर करण्याचे श्रेय आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश केळुस्कर यांना जाते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे २५ पुस्तकांवर अभिवाचनाच्या मालिका सादर केल्या आहेत. यात धनुर्धारी (वाईकर भटजी), डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आणि आम्ही) गोडसे भटजी (माझा प्रवास), मधु मंगेश कर्णिक (लागेबांधे), प्रल्हाद चेंदवणकर (टाच) आणि अन्य काही पुस्तकांचा समावेश आहे.
विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील ‘महानायक’ या कादंबरीच्या अभिवाचनाची महामालिका खूप गाजली. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील अनेक नामवंत या अभिवाचनात सहभागी झाले होते. या मालिकेचे २५५ भाग सादर झाले व या मालिकेने आकाशवाणीलाही सुमारे २५ लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला होता.
आकाशवाणीवर एखाद्या पुस्तकावरील अभिवाचन सादर झाले की वाचकांमध्ये तसेच साहित्यप्रेमींमध्ये त्या पुस्तकाची चर्चा होऊन सार्वजनिक किंवा खासगी ग्रंथालयातून त्या पुस्तकाला मागणी येते, पुस्तकाची विक्री वाढते, असा अनुभव आहे. मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांसाठीही त्याचा चांगला उपयोग झाला असल्याचे डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले.
Subscribe to:
Comments (Atom)