मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकावरून आणि या स्मारकाच्या अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती केल्याच्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने जेव्हा असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही विविध स्तरातून त्याविषयी तीव्र नाराजी प्रकट झाली होती. आता तर मराठा अभिमानाने पछाडलेल्या काही तथाकथीत नेत्यांनी स्मारकाच्या समिती अध्यक्षपदावरुन बाबासाहेब पुरंदरे यांना हटवावे, त्यांनी शिवचरित्राचे ब्राह्मणीकरण केले, शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामी यांनी उगाच मोठे केले, असे अकलेचे तारे तोडत बाबासाहेबांचा अपमान केला आहे. पुरंदरे यांच्या सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वावर घाणेरड्या शब्दांत चिखलफेक करणाऱया या नेत्यांना त्यांच्या समाजानेच जागा दाखवून दिली पाहिजे. हा वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा आहे, हे बेताल बडबड करणाऱया नेत्यांनी आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही स्पष्ट करावे.
शिवाजी महाराज यांचे चरित्र पाहिले तर असे दिसते की शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या बरोबर प्राणांची बाजी लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात मराठ्यांबरोबरच ब्राह्मण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अशा उच्च जातींबरोबरच सर्व जातीतील लोक सहभागी झाले होते. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातही ब्राह्मण मंडळी होती. शिवाजी महाराज यांनी आजच्या भ्रष्ट आणि नालायक राज्यकर्त्यांसारखे केवळ जात पाहून किंवा केवळ आपली हुजरेगिरी करणाऱया मंडळींना पदे दिलेली नव्हती. तर प्रत्येक व्यक्तीची योग्य ती पारख करून, त्याचे कर्तृत्व आणि बुद्धीमत्ता पाहूनच त्यांना पदे, व जबाबदाऱया दिल्या होत्या. या देशाशी व राजाशी निष्ठा असलेले मुसलमान मावळे व सरदारही महाराजांच्या पदरी होते. शिवाजी महाराज यांनी प्रसंगी आपल्या सग्यासोयऱयांचीही गय न करता, त्यांना दयामाया न दाखवता, त्यांच्या अपराधाला कठोर शासन केले असल्याचे दाखले इतिहासात आहेत. असे असतानाही हा सर्व इतिहास विसरुन केवळ जातीपातीचे राजकारण करून मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी करण्यात येणारे हे राजकारण पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बशिंग बांधून बसलेल्यांच्या अंगाशी येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आली नाही. खरे तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात अशी वक्तव्ये केल्याप्रकरणी या साहेबांनी बेताल वक्तव्य करणाऱया नेत्यांचे कान धरायला हवे होते, पण त्यांनी तोंडातून एक चकार शब्द काढलेला नाही. कॉंग्रेसचे नेते, मुख्यमंत्री, भाजप, शिवसेना यांचे नेतेही तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. एकट्या राज ठाकरे यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. सर्वसामान्य शिवप्रेमी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांच्या मनात जी भावना होती, त्यालाच राज ठाकरे यांनी मोकळी वाट करून दिली आहे.
गेली अनेक वर्षे बाबासाहेब पुरंदरे हे निष्ठेने आणि एखादे व्रत घेतल्याप्रमाणे शिवचरित्राचे कथन संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत शिवचरित्र पोहोचविण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. आजवर शिवचरित्रावर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर जाणता राजा सारखे भव्य महानाट्य सादर केले आहे. पुरंदरे यांच्या शिवप्रेमाविषयी, त्यांच्या निष्ठेविषयी कोणालाही शंकाही घेता येणार नाही, असे त्यांचे कार्य आहे. मात्र असे असताना तथाकथीत काही नेते जातीच्या नावावर पुरंदरे यांच्या नावाला विरोध करतात, हे आपले दुर्दैव म्हणयाचे. पुरंदरे यांनी कधीही पेशवाई व ब्राह्मण गौरवाचा उदोउदो केलेला नाही. ते पेशवाईवर व्याख्याने देत नाहीत. तसेच शिवचरित्राचा इतिहास जुन्या बखरी, कागदपत्रे यांचाच आधार घेऊन सांगतात. आपल्या मनाचे ते काही घुसडत नाहीत. शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट व अन्य प्रसंग हे ही एेतिहासिक कागदपत्रे, नोंदी व पुराव्यांच्या आधारे बोलत असतात. त्यांचे म्हणणे कोणाला पटत नसेल तर त्यांनी ते चर्चा करून खोडून काढावे, ते खोटे आहे, असे म्हणणाऱी काददपत्रे सादर करावीत. पण हे काहीही न करता केवळ पुरंदरे हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचा द्वेष करणे आणि त्यांच्याविषयी वाटेल तसे बोलणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. आता जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी या अशा भंपक व जातीच्या नावावर राजकारण करणाऱया या तथाकथीत नेत्यांना भर चौकात चाबकाने फोडले असते किंवा त्यांच्या वळवळणाऱया जीभा छाटून टाकल्या असत्या.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून समुद्रात हे स्मारक उभारण्याची खरोखरच गरज आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. महाराजांचे जीवंत स्मारक असलेले अनेक गड व किल्ले आज दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. अनेक गडांची पडझड होत आहे, त्यामुळे खरे तर या पैशातून सर्व गडांची देखभाल व दुरुस्ती करता येऊ शकेल. प्रत्येक गड व किल्ल्यावर त्या गडाचा इतिहास, लाईट अॅण्ड साऊंड सारखे शो, छायाचित्रे किंवा गडावर घडलेल्या प्रसंगांची चित्रे यांचे भव्य प्रदर्शन, गडावर घडलेले प्रसंग दर्शवणारी म्युरल्स/ पुतळे करता येतील, गडावर जाण्यासाठी चांगला रस्ता, गडावर विविध ठिकाणी त्या त्या वास्तूची ओळख सांगणारे फलक लावणे आदी कामेही करता येऊ शकतील. किंवा या पैशातून महाराष्ट्रातील अनेक खेड्यांना पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, प्राथमिक शाळा, दवाखाने, आरोग्यकेंद्रे सुरु करता येतील. पण हे सगळे करण्याची मनापासून आच व इच्छा हवी. प्रखर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते. पुरंदरे यांना घेण्यावरून जर असा नाहक वाद उत्पन्न होत असेल तर राज्य शासनाने स्मारकाचा हा प्रकल्पच रद्द करून टाकावा. पुरंदरे यांच्या विरोधात बोलणाऱयांना सुतासारखे सरळ करावे. अन्यथा पुन्हा जातीच्या राजकारणावरून महाराष्ट्रात नवा संघर्ष आणि वाद उभा राहील...
Thursday, May 28, 2009
ध्यासपंथ
ध्यासपंथ’ म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कामाची गाथा - मनोहर जोशी
प्रतिनिधी
दिनेश गुणे लिखित ‘ध्यासपंथ’ हे पुस्तक म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थाच्या कामाची गाथा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी मंगळवारी प्रभादेवी येथे केले.
परममित्र पब्लिकेशन्सतर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जोशी आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते ‘ध्यासपंथ’ यासह संतोष शिंत्रे (अरण्यरुदन), शैलेश माळोदे (अतिसूक्ष्म, महाप्रचंड), ज्ञानेश्वर भोसले (१४ महिने, १३ दिवस आणि) यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. याच वेळी परममित्र पुरस्कारांचेही वितरण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक माणूस हा स्वत:पुरता जगतो, तर काही जण कुटुंबासाठी जगतात, मात्र समाजात अशीही काही मंडळी असतात की ती समाजासाठी जगत असतात. गुणे यांच्या या पुस्तकात समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱ्या माणसांचे चित्रण करण्यात आले आहे, असेही जोशी यांनी या वेळी सांगितले.
जो संवेदनाक्षम माणूस आहे, तोच सामाजिक कामाचा पंथ अनुसरू शकेल, या पुस्तकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने किमान एका तरी सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले. डॉ. फोंडके या वेळी बोलताना म्हणाले की, आज प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमध्ये वस्तूनिष्ठ निरीक्षण, चिकित्सक विश्लेषण आणि संख्याशास्त्रीय विवेचन दिसून येते. आज आपल्या जीवनशैलीवर विज्ञान-तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असून कोणत्याही तंत्रज्ञानाचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. तो कसा करुन घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी विज्ञान समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वामध्ये विज्ञानविषयक जाणीव निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पुस्तकांचे लेखक माळोदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘नॅनो’ टेक्नॉलॉजी हा विषय युवकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. शिंत्रे यांनी सांगितले की, या पुस्तकामुळे आपल्या सर्वाना निसर्ग व पर्यावरण व त्याच्याशी निगडीत प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी मिळावी. या वेळी बोलताना गुणे म्हणाले की, विशिष्ट ध्येयाने आणि ध्यासाने समाजासाठी स्वार्थरहित काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय या पुस्तकात मी करून दिला आहे. तर भोसले यांनी आपण फासेपारधी कुटुंबात जन्म घेतला असून आपल्या समाजासाठी आपण काय केले, त्याची माहिती दिली. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी या चारही पुस्तकातील निवडक भागाचे वाचन केले. ‘ध्यासपंथ’ पुस्तकातील गिरीश प्रभुणे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर वालावलकर, संजय कांबळे, विजय जाधव यांचा या वेळी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल श्रुतिका शितोळे (मराठी), शकुंतला गावडे (संस्कृत), दिव्या रेवणकर (गणित), गिरिका भटेजा (तत्वज्ञान), अकबर पिंजारी (भौतिकशास्त्र) यांना जोशी यांच्या हस्ते परम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परममित्र प्रकाशनातर्फे घेण्यात आलेल्या गंगाधर गाडगीळ राज्यस्तरीय कथा स्पर्धेतील भरत गोडांबे व सीमा शिरोडकर या प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांचाही सत्कार करण्यात आला. संजय कांबळे यांना समाजविकास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांनी प्रास्ताविक तर अनुपमा उजगरे यांनी सूत्रसंचालन केले. परमविकास केंद्राच्या विश्वस्त संगीता पवार यांनी परममित्रच्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.
प्रतिनिधी
दिनेश गुणे लिखित ‘ध्यासपंथ’ हे पुस्तक म्हणजे समाजासाठी झटणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थाच्या कामाची गाथा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी मंगळवारी प्रभादेवी येथे केले.
परममित्र पब्लिकेशन्सतर्फे पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जोशी आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते ‘ध्यासपंथ’ यासह संतोष शिंत्रे (अरण्यरुदन), शैलेश माळोदे (अतिसूक्ष्म, महाप्रचंड), ज्ञानेश्वर भोसले (१४ महिने, १३ दिवस आणि) यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी जोशी बोलत होते. याच वेळी परममित्र पुरस्कारांचेही वितरण जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रत्येक माणूस हा स्वत:पुरता जगतो, तर काही जण कुटुंबासाठी जगतात, मात्र समाजात अशीही काही मंडळी असतात की ती समाजासाठी जगत असतात. गुणे यांच्या या पुस्तकात समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱ्या माणसांचे चित्रण करण्यात आले आहे, असेही जोशी यांनी या वेळी सांगितले.
जो संवेदनाक्षम माणूस आहे, तोच सामाजिक कामाचा पंथ अनुसरू शकेल, या पुस्तकातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने किमान एका तरी सामाजिक कामात स्वत:ला गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले. डॉ. फोंडके या वेळी बोलताना म्हणाले की, आज प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांमध्ये वस्तूनिष्ठ निरीक्षण, चिकित्सक विश्लेषण आणि संख्याशास्त्रीय विवेचन दिसून येते. आज आपल्या जीवनशैलीवर विज्ञान-तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला असून कोणत्याही तंत्रज्ञानाचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. तो कसा करुन घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी विज्ञान समजून घेतले पाहिजे. आपल्या सर्वामध्ये विज्ञानविषयक जाणीव निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पुस्तकांचे लेखक माळोदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘नॅनो’ टेक्नॉलॉजी हा विषय युवकांसाठी आव्हानात्मक विषय आहे. शिंत्रे यांनी सांगितले की, या पुस्तकामुळे आपल्या सर्वाना निसर्ग व पर्यावरण व त्याच्याशी निगडीत प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी मिळावी. या वेळी बोलताना गुणे म्हणाले की, विशिष्ट ध्येयाने आणि ध्यासाने समाजासाठी स्वार्थरहित काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय या पुस्तकात मी करून दिला आहे. तर भोसले यांनी आपण फासेपारधी कुटुंबात जन्म घेतला असून आपल्या समाजासाठी आपण काय केले, त्याची माहिती दिली. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी या चारही पुस्तकातील निवडक भागाचे वाचन केले. ‘ध्यासपंथ’ पुस्तकातील गिरीश प्रभुणे, डॉ. प्रसाद देवधर, विद्याधर वालावलकर, संजय कांबळे, विजय जाधव यांचा या वेळी जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर पदव्युत्तर शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल श्रुतिका शितोळे (मराठी), शकुंतला गावडे (संस्कृत), दिव्या रेवणकर (गणित), गिरिका भटेजा (तत्वज्ञान), अकबर पिंजारी (भौतिकशास्त्र) यांना जोशी यांच्या हस्ते परम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परममित्र प्रकाशनातर्फे घेण्यात आलेल्या गंगाधर गाडगीळ राज्यस्तरीय कथा स्पर्धेतील भरत गोडांबे व सीमा शिरोडकर या प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांचाही सत्कार करण्यात आला. संजय कांबळे यांना समाजविकास पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांनी प्रास्ताविक तर अनुपमा उजगरे यांनी सूत्रसंचालन केले. परमविकास केंद्राच्या विश्वस्त संगीता पवार यांनी परममित्रच्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.
Friday, May 8, 2009
सुरु आहे दुर्मिळ पोथ्यांचे स्कॅनिंग
बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ‘पोथीशाळेत’ सुरू आहे दुर्मिळ पोथ्यांचे स्कॅनिंग!
प्रतिनिधी
महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विविध भागात अनेक जुनी व दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्या असून काळाच्या ओघात हा अनमोल ठेवा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था व अन्य काही संस्था हे काम करत असून त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाची भर पडली आहे. या विभागात असलेल्या पाच हजार दुर्मिळ हस्तलिखित पोथ्यांचे स्कॅनिंग करण्यात येत असून त्याच्या सीडी तयार करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे दोन लाख पाने स्कॅन करण्यात आली आहेत.
विदयापीठाच्या मराठी विभागात सुमारे पाच हजार हस्तलिखिते असून ती दुर्मिळ आहेत. अभ्यासक, संशोधक किंवा सर्वसामान्यांना ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि हा ठेवा नष्ट न होता, तो कायम स्वरुपी टिकून राहण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. येत्या एक ते दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल,अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे. या अनमोल ठेव्यामध्ये महानुभाव, दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि अन्य काही पोथ्यांचा समावेश आहे. महानुभाव पंथांच्या पोथ्या सांकेतिक लिपीत आहेत. डॉ. अशोक देशमाने व प्रा. सतीश बडवे हे काम पाहात आहेत. मराठी विभागात या पोथ्या जमा करण्याचे काम माजी विभागप्रमुख डॉ. यु. म. पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. डॉ. पठाण यांच्याही मार्गदर्शनाखाली काही काळ हे काम करण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आर्थिक मदतीतून हे काम करण्यात येत आहे. सर्व पोथ्यांचे स्कॅनिंग करून झाल्यानंतर सर्व पोथ्यांची यादी सीडी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. दत्ता भगत यांनी स्कॅनिंगसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.
प्रतिनिधी
महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या विविध भागात अनेक जुनी व दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्या असून काळाच्या ओघात हा अनमोल ठेवा हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था व अन्य काही संस्था हे काम करत असून त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाची भर पडली आहे. या विभागात असलेल्या पाच हजार दुर्मिळ हस्तलिखित पोथ्यांचे स्कॅनिंग करण्यात येत असून त्याच्या सीडी तयार करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे दोन लाख पाने स्कॅन करण्यात आली आहेत.
विदयापीठाच्या मराठी विभागात सुमारे पाच हजार हस्तलिखिते असून ती दुर्मिळ आहेत. अभ्यासक, संशोधक किंवा सर्वसामान्यांना ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि हा ठेवा नष्ट न होता, तो कायम स्वरुपी टिकून राहण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. येत्या एक ते दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल,अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे. या अनमोल ठेव्यामध्ये महानुभाव, दत्तसंप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि अन्य काही पोथ्यांचा समावेश आहे. महानुभाव पंथांच्या पोथ्या सांकेतिक लिपीत आहेत. डॉ. अशोक देशमाने व प्रा. सतीश बडवे हे काम पाहात आहेत. मराठी विभागात या पोथ्या जमा करण्याचे काम माजी विभागप्रमुख डॉ. यु. म. पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. डॉ. पठाण यांच्याही मार्गदर्शनाखाली काही काळ हे काम करण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आर्थिक मदतीतून हे काम करण्यात येत आहे. सर्व पोथ्यांचे स्कॅनिंग करून झाल्यानंतर सर्व पोथ्यांची यादी सीडी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. दत्ता भगत यांनी स्कॅनिंगसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.
Thursday, May 7, 2009
तुकारामांचे चरित्र आता राजस्थानीतही
तुकारामांचे चरित्र राजस्थानीतही!
मुंबई, ७ मे / प्रतिनिधी
जगभर लोकप्रिय असलेल्या www.tukram.com या संकेतस्थळावर आता राजस्थानी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र राजस्थानी भाषेत अनुवादित करून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या या संकेतस्थळावर मराठीसह १० प्रादेशिक व चार परदेशी भाषांमध्ये तुकारामांचे चरित्र, लेख आणि अभंग उपलब्ध आहेत.
‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या राजस्थानी विभागात डॉ. सत्यनारायण स्वामी यांनी तुकाराम चरित्राचा राजस्थानी भाषेत केलेला अनुवाद वाचायला मिळतो. तसेच काही निवडक अभंगांचे निरुपणही त्यांनी केलेले आहे. स्वामी यांनी यापूर्वी शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचा राजस्थानी भाषेत अनुवाद केलेला आहे.
१७ फेब्रुवारी २००२ मध्ये हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. दिलीप धोंडे या संकेतस्थळाचे समन्वयक असून डॉ. सदानंद मोरे व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र बऱ्हाटे, गिरीश गांधी, देवेन राक्षे, सतीश पंडिलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे. मराठीतील संकेतस्थळावर लेख, छायाचित्रे, अभंग, चरित्र आदी विविध विभाग आहेत. या संकेतस्थळावर देहू येथील श्री तुकाराम महाराज संस्थानच्या सौजन्याने तुकाराम गाथेची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ परदेशातही लोकप्रिय असून गेल्या सात वर्षांत जगभरातीलही लाखो नेटकऱ्यांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.
मुंबई, ७ मे / प्रतिनिधी
जगभर लोकप्रिय असलेल्या www.tukram.com या संकेतस्थळावर आता राजस्थानी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र राजस्थानी भाषेत अनुवादित करून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या या संकेतस्थळावर मराठीसह १० प्रादेशिक व चार परदेशी भाषांमध्ये तुकारामांचे चरित्र, लेख आणि अभंग उपलब्ध आहेत.
‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या राजस्थानी विभागात डॉ. सत्यनारायण स्वामी यांनी तुकाराम चरित्राचा राजस्थानी भाषेत केलेला अनुवाद वाचायला मिळतो. तसेच काही निवडक अभंगांचे निरुपणही त्यांनी केलेले आहे. स्वामी यांनी यापूर्वी शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचा राजस्थानी भाषेत अनुवाद केलेला आहे.
१७ फेब्रुवारी २००२ मध्ये हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. दिलीप धोंडे या संकेतस्थळाचे समन्वयक असून डॉ. सदानंद मोरे व दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र बऱ्हाटे, गिरीश गांधी, देवेन राक्षे, सतीश पंडिलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे. मराठीतील संकेतस्थळावर लेख, छायाचित्रे, अभंग, चरित्र आदी विविध विभाग आहेत. या संकेतस्थळावर देहू येथील श्री तुकाराम महाराज संस्थानच्या सौजन्याने तुकाराम गाथेची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ परदेशातही लोकप्रिय असून गेल्या सात वर्षांत जगभरातीलही लाखो नेटकऱ्यांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे.
Monday, May 4, 2009
मराठी वाङ्मयाचा इतिहास
महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार मराठी वाङ्मयाचा इतिहास सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम पूर्ण
प्रतिनिधी
स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांतील मराठी वाङ्यमयाच्या इतिहासाचा आढावा घेणारा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार आहे. या ग्रंथात १९५० ते २००० या कालखंडातील साहित्याचा समग्र आढावा घेण्यात येणार असून या महिन्यातच पुस्तकाच्या या पहिल्या भागाचे प्रकाशन होणार आहे. ‘मसाप’तर्फे मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा घेणारे खंड प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम आता पूर्ण झाले आहे. या सातव्या खंडाचे तीन भाग करण्यात आले असून त्यात सुमारे चाळीस विषय हाताळण्यात आले आहेत. ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या संपादनाखाली सातवा खंड तयार होत आहे. ‘मसाप’चे वि. भा. देशपांडे हे कार्यकारी संपादक आहेत.
या खंडात मराठी चरित्र वाङ्मय, प्रवासवर्णन, विज्ञान, स्त्रीवादी, बाल साहित्य, संगीत, शिल्प व चित्रकला यासह अन्य विषयांचा या खंडात समग्र आढावा घेण्यात येणार आहे. डॉ. वसंत आबाजी डहाके, निरंजन घाटे, डॉ. अश्विनी धोंगडे आणि अन्य मान्यवर व तज्ज्ञ मंडळींचे लेख या खंडामध्ये आहेत. ‘मसाप’चा १०३ वा वर्धापन दिन येत्या २७ मे रोजी असून त्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात सातव्या खंडाचा पहिला भाग प्रकाशित करण्यात येणार आहे.
प्रतिनिधी
स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांतील मराठी वाङ्यमयाच्या इतिहासाचा आढावा घेणारा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार आहे. या ग्रंथात १९५० ते २००० या कालखंडातील साहित्याचा समग्र आढावा घेण्यात येणार असून या महिन्यातच पुस्तकाच्या या पहिल्या भागाचे प्रकाशन होणार आहे. ‘मसाप’तर्फे मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा घेणारे खंड प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम आता पूर्ण झाले आहे. या सातव्या खंडाचे तीन भाग करण्यात आले असून त्यात सुमारे चाळीस विषय हाताळण्यात आले आहेत. ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या संपादनाखाली सातवा खंड तयार होत आहे. ‘मसाप’चे वि. भा. देशपांडे हे कार्यकारी संपादक आहेत.
या खंडात मराठी चरित्र वाङ्मय, प्रवासवर्णन, विज्ञान, स्त्रीवादी, बाल साहित्य, संगीत, शिल्प व चित्रकला यासह अन्य विषयांचा या खंडात समग्र आढावा घेण्यात येणार आहे. डॉ. वसंत आबाजी डहाके, निरंजन घाटे, डॉ. अश्विनी धोंगडे आणि अन्य मान्यवर व तज्ज्ञ मंडळींचे लेख या खंडामध्ये आहेत. ‘मसाप’चा १०३ वा वर्धापन दिन येत्या २७ मे रोजी असून त्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात सातव्या खंडाचा पहिला भाग प्रकाशित करण्यात येणार आहे.
प्राणीसंग्रहालय बंद करण्याची मागणी
भायखळा येथील प्राणीसंग्रहालय बंद करण्याची प्राणी संघटनांची मागणी
प्रतिनिधी
भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेण्याबाबत महापालिका प्रशासन अपयशी ठरले असून त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, अशी मागणी विविध प्राणीमित्र संघटनांनी केली आहे. या संदर्भात पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) या संघटनेने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. या प्राणीसंग्रहालयातील एका पाणघोडय़ाचा नुकताच मृत्यू झाला होता.
त्या पाश्र्वभूमीवर ‘पेटा’ने ही मागणी केली आहे. अनेक प्राणीमित्र संघटनांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसून त्यांना पाहिजे त्या प्रमाणात नैसर्गिक वातावरण मिळत नाही. पक्ष्यांना मुक्तपणे उडता येत नसल्याची तेथे परिस्थिती आहे. तेथील कर्मचाऱ्यांकडून या प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नाही, त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, असे प्राणीमित्र संघटनांचे म्हणणे आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र प्राणीमित्र संघटनांकडून घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. येथील कर्मचारी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची तसेच प्राणीसंग्रहालयाच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही प्राण्यांची योग्य प्रकारे काळजी घेतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रतिनिधी
भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची काळजी घेण्याबाबत महापालिका प्रशासन अपयशी ठरले असून त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, अशी मागणी विविध प्राणीमित्र संघटनांनी केली आहे. या संदर्भात पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) या संघटनेने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र पाठवले आहे. या प्राणीसंग्रहालयातील एका पाणघोडय़ाचा नुकताच मृत्यू झाला होता.
त्या पाश्र्वभूमीवर ‘पेटा’ने ही मागणी केली आहे. अनेक प्राणीमित्र संघटनांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नसून त्यांना पाहिजे त्या प्रमाणात नैसर्गिक वातावरण मिळत नाही. पक्ष्यांना मुक्तपणे उडता येत नसल्याची तेथे परिस्थिती आहे. तेथील कर्मचाऱ्यांकडून या प्राण्यांची योग्य ती काळजी घेतली जात नाही, त्यामुळे हे प्राणीसंग्रहालय बंद करण्यात यावे, असे प्राणीमित्र संघटनांचे म्हणणे आहे.
प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र प्राणीमित्र संघटनांकडून घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. येथील कर्मचारी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांची तसेच प्राणीसंग्रहालयाच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही प्राण्यांची योग्य प्रकारे काळजी घेतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
भावगीतांचा सुवर्णकाळ
आजपासून दर मंगळवारी ‘भावगीतांचा सुवर्णकाळ’!
मुंबई, ४ मे / प्रतिनिधी
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या, ५ मे पासून दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ‘भावगीतांचा सुवर्णकाळ’ ही मालिका प्रसारित होणार आहे. भावगीतांच्या सुरेल आठवणी, किस्से, संदर्भ, जुनी भावगीते असे या मालिकेचे स्वरूप आहे.
मुंबई, ४ मे / प्रतिनिधी
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या, ५ मे पासून दर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ‘भावगीतांचा सुवर्णकाळ’ ही मालिका प्रसारित होणार आहे. भावगीतांच्या सुरेल आठवणी, किस्से, संदर्भ, जुनी भावगीते असे या मालिकेचे स्वरूप आहे.
कोकणातील सर्व ग्रंथालये आता एका क्लिकवर
कोकणातील सर्व ग्रंथालये आणि पुस्तकांची माहिती एका क्लिकवर!
प्रतिनिधी
ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या एका संकेतस्थळामुळे कोकणातील सर्व ग्रंथालये आणि या ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके केवळ एका क्लिकद्वारे जगभरातील साहित्यप्रेमी आणि वाचकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या ठाणे
जिल्ह्यातील पाच ग्रंथालयांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.granthalaya.org असे या संकेतस्थळाचे नाव आहे. कोकणात विविध ठिकाणी असलेल्या ग्रंथालयांमध्ये अनेक दुर्मिळ आणि मौलिक ग्रंथसंपदा असून जगभरातील वाचक आणि अभ्यासकांना या संकेतस्थळामुळे त्यांची माहिती मिळणार आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. विजय बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून जोशी-बेडेकर महाविद्यालयातील ग्रंथपाल नारायण बारसे, संतोष भावसार व कौस्तुभ काळे यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मराठी ग्रंथसंग्रहालय, नगर वाचन मंदिर, जव्हार वाचनालय, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय व सार्वजनिक ग्रंथालय-कल्याण अशी पाच ग्रंथालये सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोकण विभागातील सर्व ग्रंथालये आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके यांची माहिती लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. पुढील वर्षी हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या संकेतस्थळावर सुमारे २५ लाख पुस्तकांची यादी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे अभ्यासक, साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी ही मोठी सोय होणार आहे.
प्रतिनिधी
ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या एका संकेतस्थळामुळे कोकणातील सर्व ग्रंथालये आणि या ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके केवळ एका क्लिकद्वारे जगभरातील साहित्यप्रेमी आणि वाचकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या ठाणे
जिल्ह्यातील पाच ग्रंथालयांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.granthalaya.org असे या संकेतस्थळाचे नाव आहे. कोकणात विविध ठिकाणी असलेल्या ग्रंथालयांमध्ये अनेक दुर्मिळ आणि मौलिक ग्रंथसंपदा असून जगभरातील वाचक आणि अभ्यासकांना या संकेतस्थळामुळे त्यांची माहिती मिळणार आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. विजय बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून जोशी-बेडेकर महाविद्यालयातील ग्रंथपाल नारायण बारसे, संतोष भावसार व कौस्तुभ काळे यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मराठी ग्रंथसंग्रहालय, नगर वाचन मंदिर, जव्हार वाचनालय, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय व सार्वजनिक ग्रंथालय-कल्याण अशी पाच ग्रंथालये सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोकण विभागातील सर्व ग्रंथालये आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके यांची माहिती लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. पुढील वर्षी हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या संकेतस्थळावर सुमारे २५ लाख पुस्तकांची यादी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे अभ्यासक, साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी ही मोठी सोय होणार आहे.
Sunday, May 3, 2009
वक्ता दशसहस्त्रेषु
वक्ता दशसहस्त्रेषु’
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मुंबईतील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रालाही जबरदस्त धक्का बसला आहे. शेवाळकर यांच्या जाण्याने ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हरपला आहेच, पण त्याच बरोबर महाराष्ट्र साहित्य, संस्कृती, संतसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासकाला मुकला असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य साहित्यप्रेमी, वाचकांबरोबरच राजकारण आणि अन्य क्षेत्रातील लोकांनीही शेवाळकर यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अरुण साधू (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)- शेवाळकर यांचे निधन ही धक्कादायक बातमी आहे. ते उत्कृष्ट वक्ते, भारतीय व मराठी संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. ते मला आपला धाकटा भाऊ मानत असत. अत्यंत मनमोकळा स्वभाव आणि खास वऱ्हाडी शैलीतील आदरातिथ्य ही त्यांची वैशिष्टय़े होती.
विद्याधर निमकर (चतुरंग प्रतिष्ठान)- आमच्या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेचे ते आधारवड होते. संस्था कशी चालवायची आणि ती चालवतांना माणसांना कसे जोडून ठेवायचे, याचा ते एक आदर्श वस्तूपाठ होते. आम्ही वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असू. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रावर त्यांचा एक आदरयुक्त व प्रेमळ असा दरारा होता. कोणत्याही घटनेतून चांगला अर्थ कसा काढायचा, हे त्यांनीच आम्हाला शिकवले.
डॉ. अरुण टिकेकर (ज्येष्ठ पत्रकार व एशियाटीक सोसायटीचे अध्यक्ष)-शेवाळकर अमोघ वक्तृत्वाची निसर्गदत्त देणगी लाभलेले, संत वाङ्मयाचे भाष्यकार, समाजात टोकाची भूमिका घेणाऱ्यांमध्ये सामंजस्य साधू पाहणारे समन्वयक, ऋजू व्यक्तीमत्वाचे पण चुकणाऱ्याला प्रसंगी चार शब्द सुनावण्याचे सामथ्र्य असलेले आणि साहित्य व संस्कृतीचे व्यासंगी आज आपल्यातून निघून गेले आहेत. हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मोठे नुकसान आहेच, पण त्याचबरोबर समाजाचेही अपरिमित नुकसान आहे.
प्रा. डॉ. सुभाष भेंडे (ज्येष्ठ साहित्यिक)- शेवाळकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. रसाळ वाणीचा आणि श्रोत्यांना एका जागी खिळवून ठेवणारा वक्ता म्हणून त्यांची चांद्यापासून बांद्यापर्यंत ख्याती होती. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने सारे जण मंत्रमुग्ध होऊन जायचे.
नागपूरातील त्यांचे निवासस्थान हे विदर्भातील एक सांस्कृतिक केंद्र होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य व संस्कृतीची कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे.
प्रा. के. ज. पुरोहित (जेष्ठ साहित्यिक)- मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांचे वाचन अखंड होते. संस्था कशी वाढवावी आणि माणसे कशी जोडावीत, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या निधनाने आपण सांस्कृतिक क्षेत्राचा फार मोठा आधार गमावला आहे.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय ऊर्जामंत्री)- शेवाळकर हे विचारवंत आणि बुद्धीवंत होते. मराठी साहित्य व भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने युवकांना प्रेरणा मिळायची तर सर्वसामान्य लोकांना त्यांचे वकृत्व विचार करायला लावायचे.
नितीन गडकरी (भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)- शेवाळकर आणि आमचे कौटुंबीक संबंध होते. ते विदर्भाचा अभिमान आणि ‘महाराष्ट्र भूषण’ होते. मराठीवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. सोप्या व सर्वाना सहज समजेल, अशा भाषेत ते लेखन करत असत.
माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस-आयचे प्रदेशाध्यक्ष)- युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व संस्कृतीची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही.
अशोक चव्हाण (मुख्यमंत्री)- ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी संपूर्ण राज्यात ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मराठी साहित्यातील तेजस्वी तारा निखळला आहे. लाखो रसिकांवर त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी पडली होती. ज्ञानेश्वरी, रामायण आणि महाभारताच्या निरुपणाला त्यांनी आपल्या प्रतिभेने वेगळ्या उंचीवर पोहोचवले होते.
छगन भुजबळ (उपमुख्यमंत्री)- मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला आहे. मराठी साहित्य व संस्कृती क्षेत्रातील त्यांचा वावर हा अनेकांना आधार देणारा होता. त्यांच्या मतांचा सर्वत्र आदर केला जात असे.
मनोहर जोशी (शिवसेना नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष)- शेवाळकर यांच्या निधनाने मराठी शारदेचा सच्चा उपासक आपल्यातून निघून गेला आहे. एक चतुरस्र साहित्यिक म्हणून ते कायमच मराठी वाचकांच्या स्मरणात राहतील. ते माझे वैयक्तिक मित्र असल्याने माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला ते उपस्थित राहात.
आर. आर. पाटील (माजी उपमुख्यमंत्री)- सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्था आणि व्यक्तींचे ते आधारस्तंभ होते. उत्तम संघटक, उत्तम लेखक आणि अनुपमवाणी वैभवाचे धनी असेलेले शेवाळकर आज आपल्यात नाहीत.
विलासराव देशमुख (माजी मुख्यमंत्री)- कविता, आत्मकथन, ललित लेखनासह सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी आपला स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांना अमोघ वाणीचे वरदान मिळाले होते. त्यांचा नम्र व आगत्यशील स्वभाव आणि वऱ्हाडी आदरातिथ्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी तत्ववेत्ता व विचारवंत आणि उत्तम वक्ता गमावला आहे
मुंबई, ३ मे / प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मुंबईतील साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रालाही जबरदस्त धक्का बसला आहे. शेवाळकर यांच्या जाण्याने ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हरपला आहेच, पण त्याच बरोबर महाराष्ट्र साहित्य, संस्कृती, संतसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासकाला मुकला असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त करण्यात येत आहे. सर्वसामान्य साहित्यप्रेमी, वाचकांबरोबरच राजकारण आणि अन्य क्षेत्रातील लोकांनीही शेवाळकर यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अरुण साधू (ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)- शेवाळकर यांचे निधन ही धक्कादायक बातमी आहे. ते उत्कृष्ट वक्ते, भारतीय व मराठी संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे संबंध होते. ते मला आपला धाकटा भाऊ मानत असत. अत्यंत मनमोकळा स्वभाव आणि खास वऱ्हाडी शैलीतील आदरातिथ्य ही त्यांची वैशिष्टय़े होती.
विद्याधर निमकर (चतुरंग प्रतिष्ठान)- आमच्या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेचे ते आधारवड होते. संस्था कशी चालवायची आणि ती चालवतांना माणसांना कसे जोडून ठेवायचे, याचा ते एक आदर्श वस्तूपाठ होते. आम्ही वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असू. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रावर त्यांचा एक आदरयुक्त व प्रेमळ असा दरारा होता. कोणत्याही घटनेतून चांगला अर्थ कसा काढायचा, हे त्यांनीच आम्हाला शिकवले.
डॉ. अरुण टिकेकर (ज्येष्ठ पत्रकार व एशियाटीक सोसायटीचे अध्यक्ष)-शेवाळकर अमोघ वक्तृत्वाची निसर्गदत्त देणगी लाभलेले, संत वाङ्मयाचे भाष्यकार, समाजात टोकाची भूमिका घेणाऱ्यांमध्ये सामंजस्य साधू पाहणारे समन्वयक, ऋजू व्यक्तीमत्वाचे पण चुकणाऱ्याला प्रसंगी चार शब्द सुनावण्याचे सामथ्र्य असलेले आणि साहित्य व संस्कृतीचे व्यासंगी आज आपल्यातून निघून गेले आहेत. हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मोठे नुकसान आहेच, पण त्याचबरोबर समाजाचेही अपरिमित नुकसान आहे.
प्रा. डॉ. सुभाष भेंडे (ज्येष्ठ साहित्यिक)- शेवाळकर हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. रसाळ वाणीचा आणि श्रोत्यांना एका जागी खिळवून ठेवणारा वक्ता म्हणून त्यांची चांद्यापासून बांद्यापर्यंत ख्याती होती. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने सारे जण मंत्रमुग्ध होऊन जायचे.
नागपूरातील त्यांचे निवासस्थान हे विदर्भातील एक सांस्कृतिक केंद्र होते. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य व संस्कृतीची कधीही भरून येणार नाही, अशी हानी झाली आहे.
प्रा. के. ज. पुरोहित (जेष्ठ साहित्यिक)- मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांचे वाचन अखंड होते. संस्था कशी वाढवावी आणि माणसे कशी जोडावीत, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. त्यांच्या निधनाने आपण सांस्कृतिक क्षेत्राचा फार मोठा आधार गमावला आहे.
राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
सुशीलकुमार शिंदे (केंद्रीय ऊर्जामंत्री)- शेवाळकर हे विचारवंत आणि बुद्धीवंत होते. मराठी साहित्य व भाषेसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने युवकांना प्रेरणा मिळायची तर सर्वसामान्य लोकांना त्यांचे वकृत्व विचार करायला लावायचे.
नितीन गडकरी (भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)- शेवाळकर आणि आमचे कौटुंबीक संबंध होते. ते विदर्भाचा अभिमान आणि ‘महाराष्ट्र भूषण’ होते. मराठीवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. सोप्या व सर्वाना सहज समजेल, अशा भाषेत ते लेखन करत असत.
माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस-आयचे प्रदेशाध्यक्ष)- युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व संस्कृतीची जी हानी झाली आहे, ती कधीही भरून येणार नाही.
अशोक चव्हाण (मुख्यमंत्री)- ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ अशी संपूर्ण राज्यात ख्याती प्राप्त केलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या निधनाने मराठी साहित्यातील तेजस्वी तारा निखळला आहे. लाखो रसिकांवर त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी पडली होती. ज्ञानेश्वरी, रामायण आणि महाभारताच्या निरुपणाला त्यांनी आपल्या प्रतिभेने वेगळ्या उंचीवर पोहोचवले होते.
छगन भुजबळ (उपमुख्यमंत्री)- मराठी साहित्याचा आधारस्तंभ हरपला आहे. मराठी साहित्य व संस्कृती क्षेत्रातील त्यांचा वावर हा अनेकांना आधार देणारा होता. त्यांच्या मतांचा सर्वत्र आदर केला जात असे.
मनोहर जोशी (शिवसेना नेते व लोकसभेचे माजी अध्यक्ष)- शेवाळकर यांच्या निधनाने मराठी शारदेचा सच्चा उपासक आपल्यातून निघून गेला आहे. एक चतुरस्र साहित्यिक म्हणून ते कायमच मराठी वाचकांच्या स्मरणात राहतील. ते माझे वैयक्तिक मित्र असल्याने माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या प्रकाशनाला ते उपस्थित राहात.
आर. आर. पाटील (माजी उपमुख्यमंत्री)- सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक संस्था आणि व्यक्तींचे ते आधारस्तंभ होते. उत्तम संघटक, उत्तम लेखक आणि अनुपमवाणी वैभवाचे धनी असेलेले शेवाळकर आज आपल्यात नाहीत.
विलासराव देशमुख (माजी मुख्यमंत्री)- कविता, आत्मकथन, ललित लेखनासह सर्व वाङ्मय प्रकारात त्यांनी आपला स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला होता. त्यांना अमोघ वाणीचे वरदान मिळाले होते. त्यांचा नम्र व आगत्यशील स्वभाव आणि वऱ्हाडी आदरातिथ्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी तत्ववेत्ता व विचारवंत आणि उत्तम वक्ता गमावला आहे
Friday, May 1, 2009
संमेलनातील घडामोडींवर पोलिसांचा अहवाल
महाबळेश्वर संमेलनातील घडामोडींवर पोलिसांचा अहवाल
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
वाद-विवादांसह नवनवे विक्रम घडवून महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या साहित्य संमेलनात आणि त्यापूर्वी घडलेल्या घडामोडींचा समग्र अहवाल पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संमेलनात ज्यांचा सहभाग होता, अशा व्यक्तींचीही चौकशी केली गेली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. साहित्य संमेलनाबाबत पोलिसांनी अहवाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि गृहमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते दोघेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
वाद-विवादांसह नवनवे विक्रम घडवून महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या साहित्य संमेलनात आणि त्यापूर्वी घडलेल्या घडामोडींचा समग्र अहवाल पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संमेलनात ज्यांचा सहभाग होता, अशा व्यक्तींचीही चौकशी केली गेली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. साहित्य संमेलनाबाबत पोलिसांनी अहवाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि गृहमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते दोघेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
साहित्यिकानीही केले मतदान
मतदान हा हक्क आणि कर्तव्यसुद्धा
साहित्यिकांनींही केले मतदान
मुंबई, ३० एप्रिल / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या महाराष्ट्रातील तिसऱ्या व शेवटच्या टप्यात बृहन्मुंबईसह ठाणे परिसरात मतदान झाले. आजच्या मतदानात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध साहित्यिकानीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य असल्यानेच आपण दरवेळी न चुकता मतदान करतो, असे साहित्यिकांकडून सांगण्यात आले.
मी आणि माझे कुटुंबीय महापालिकेसह, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी दरवेळी मतदान करतो. आजही आम्ही मतदान केले. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे, मी जेथे राहतो ते ‘साहित्य सहवास’ वांद्रे (पश्चिम) येथे असून हा भाग उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात येतो. एमआयजी क्लबजवळील नवजीवन शाळेत आमचे मतदान केंद्र होते. मी सकाळी अकराच्या सुमारास मतदानाला गेलो होतो. त्यावेळेस संमिश्र प्रतिसाद दिसून आल्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांनी सांगितले.
साहित्य सहवासाच्या एकूण नऊ इमारती असून तेथे ८२ फ्लॅट्स आहेत. आमच्या येथील सर्वचजण दरवेळी न चुकता मतदान करतात. आमच्या मतदार संघात किंवा आम्ही राहतो त्या परिसरात मिठी नदी आणि त्याच्या सभोवतालची बेकायदा बांधकामे, कलानगर येथील जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ आदी काही प्रमुख प्रश्न आहेत. आमच्या येथून जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल, त्याने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असेही भेंडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी िवदा करंदीकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, माझे वय आता नवव्द असून प्रकृतीअस्वाथ्यामुळे मी हल्ली मतदान करत नाही. त्यामुळे मला या विषयावर अधिक काही बोलता येणार नाही.
राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक म्हणाल्या की, मी आणि माझ्या पतींनी दक्षिण मुंबईत वनिता विश्राम शाळा येतील मतदान केंद्रात मतदान केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास मतदानाला गेलो असता त्यावेळेस गुजराथी भाषिक जास्त संख्येने मतदानाला आलेले दिसले. दक्षिण मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास, बंद होणाऱ्या गिरण्या व त्यातील कामगार, वाहतूक कोंडी आदी प्रश्न महत्वाचे असून निवडून आलेल्या भावी खासदाराने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. भावी खासदाराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असावी. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्याने सक्रिय असावे, असे वाटते. तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगाकर यांनी सांगितले की, मी प्रत्येक निवडणुकीला न चुकता मतदान करतो. आजही ककाळी मी मतदान करून आलो. मी शीव येथे राहतो. दक्षिण मध्य मुंबई हा आमचा लोकसभा मतदार संघ असून माझ्या घराजवळ असलेल्या महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रात मी मतदान केले. कोण निवडून येईल, ते सांगता येणार नाही.
साहित्यिकांनींही केले मतदान
मुंबई, ३० एप्रिल / प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या आज पार पडलेल्या महाराष्ट्रातील तिसऱ्या व शेवटच्या टप्यात बृहन्मुंबईसह ठाणे परिसरात मतदान झाले. आजच्या मतदानात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध साहित्यिकानीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य असल्यानेच आपण दरवेळी न चुकता मतदान करतो, असे साहित्यिकांकडून सांगण्यात आले.
मी आणि माझे कुटुंबीय महापालिकेसह, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी दरवेळी मतदान करतो. आजही आम्ही मतदान केले. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे, मी जेथे राहतो ते ‘साहित्य सहवास’ वांद्रे (पश्चिम) येथे असून हा भाग उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात येतो. एमआयजी क्लबजवळील नवजीवन शाळेत आमचे मतदान केंद्र होते. मी सकाळी अकराच्या सुमारास मतदानाला गेलो होतो. त्यावेळेस संमिश्र प्रतिसाद दिसून आल्याचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांनी सांगितले.
साहित्य सहवासाच्या एकूण नऊ इमारती असून तेथे ८२ फ्लॅट्स आहेत. आमच्या येथील सर्वचजण दरवेळी न चुकता मतदान करतात. आमच्या मतदार संघात किंवा आम्ही राहतो त्या परिसरात मिठी नदी आणि त्याच्या सभोवतालची बेकायदा बांधकामे, कलानगर येथील जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ आदी काही प्रमुख प्रश्न आहेत. आमच्या येथून जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल, त्याने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असेही भेंडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी िवदा करंदीकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, माझे वय आता नवव्द असून प्रकृतीअस्वाथ्यामुळे मी हल्ली मतदान करत नाही. त्यामुळे मला या विषयावर अधिक काही बोलता येणार नाही.
राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक म्हणाल्या की, मी आणि माझ्या पतींनी दक्षिण मुंबईत वनिता विश्राम शाळा येतील मतदान केंद्रात मतदान केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास मतदानाला गेलो असता त्यावेळेस गुजराथी भाषिक जास्त संख्येने मतदानाला आलेले दिसले. दक्षिण मुंबईतील जुन्या चाळींचा पुनर्विकास, बंद होणाऱ्या गिरण्या व त्यातील कामगार, वाहतूक कोंडी आदी प्रश्न महत्वाचे असून निवडून आलेल्या भावी खासदाराने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. भावी खासदाराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असावी. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्याने सक्रिय असावे, असे वाटते. तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगाकर यांनी सांगितले की, मी प्रत्येक निवडणुकीला न चुकता मतदान करतो. आजही ककाळी मी मतदान करून आलो. मी शीव येथे राहतो. दक्षिण मध्य मुंबई हा आमचा लोकसभा मतदार संघ असून माझ्या घराजवळ असलेल्या महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रात मी मतदान केले. कोण निवडून येईल, ते सांगता येणार नाही.
Subscribe to:
Comments (Atom)