महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार मराठी वाङ्मयाचा इतिहास सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम पूर्ण
प्रतिनिधी
स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांतील मराठी वाङ्यमयाच्या इतिहासाचा आढावा घेणारा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद प्रकाशित करणार आहे. या ग्रंथात १९५० ते २००० या कालखंडातील साहित्याचा समग्र आढावा घेण्यात येणार असून या महिन्यातच पुस्तकाच्या या पहिल्या भागाचे प्रकाशन होणार आहे. ‘मसाप’तर्फे मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा घेणारे खंड प्रकाशित करण्यात येणार असून त्यातील सातव्या खंडाच्या पहिल्या भागाचे काम आता पूर्ण झाले आहे. या सातव्या खंडाचे तीन भाग करण्यात आले असून त्यात सुमारे चाळीस विषय हाताळण्यात आले आहेत. ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या संपादनाखाली सातवा खंड तयार होत आहे. ‘मसाप’चे वि. भा. देशपांडे हे कार्यकारी संपादक आहेत.
या खंडात मराठी चरित्र वाङ्मय, प्रवासवर्णन, विज्ञान, स्त्रीवादी, बाल साहित्य, संगीत, शिल्प व चित्रकला यासह अन्य विषयांचा या खंडात समग्र आढावा घेण्यात येणार आहे. डॉ. वसंत आबाजी डहाके, निरंजन घाटे, डॉ. अश्विनी धोंगडे आणि अन्य मान्यवर व तज्ज्ञ मंडळींचे लेख या खंडामध्ये आहेत. ‘मसाप’चा १०३ वा वर्धापन दिन येत्या २७ मे रोजी असून त्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात सातव्या खंडाचा पहिला भाग प्रकाशित करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment