महाबळेश्वर संमेलनातील घडामोडींवर पोलिसांचा अहवाल
मुंबई, १ मे / प्रतिनिधी
वाद-विवादांसह नवनवे विक्रम घडवून महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या साहित्य संमेलनात आणि त्यापूर्वी घडलेल्या घडामोडींचा समग्र अहवाल पोलीस आणि गुप्तचर विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संमेलनात ज्यांचा सहभाग होता, अशा व्यक्तींचीही चौकशी केली गेली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली. साहित्य संमेलनाबाबत पोलिसांनी अहवाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि गृहमंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते दोघेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment