रुपारेलच्या अंगणी अवतरली ‘पंढरीची वारी’!
प्रतिनिधी
टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात दादर येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालयात मंगळवारी सायंकाळी चक्क पंढरीची वारी अवतरली आणि उपस्थित सर्व श्रोतृवर्ग विठ्ठलमय होऊन गेला. पंढरपूरची वारी म्हणजे आषाढ किंवा कार्तिक महिना, असा आपला समज असताना चक्क माघ महिन्यांत ही वारी निघाली होती. या वारीने केवळ आळंदीहून प्रस्थानच केले नाही तर चक्क पंढरपूपर्यंतचा वीस दिवसांचा प्रवासही उपस्थितांना घडवला..
निमित्त होते ते मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग, श्रीपाद सेवा मंडळ आणि रुपारेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वारी-एक शोध’ या कार्यक्रमाचे. काल या कार्यक्रमात डॉ.रोहन उपळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘वारी-एक प्रवासानुभूती’ हा कार्यक्रम सादर केला. भजन, किर्तन आणि पंढरीच्या वारीत जे कार्यक्रम होतात, त्याचे यथार्थ दर्शन या कार्यक्रमातून घडविण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पंढरीची वारी हे मराठी संस्कृतीचे लणे असून गेली सातशे वर्षे ही वारी अखंडपणे सुरू आहे. यातून सामाजिक अभिसरणाचे महत्वपूर्ण काम घडत असून वारीच्यानिमित्ताने जाती-भेदाच्या िभती ओलांडून समाजातील विविध स्तरातील मंडळी एकत्र येतात. मात्र वारी संपल्यानंतर आपण वारीतले जीवन जगत नाही. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ असा अभंग आपण टाळ कुटून म्हणतो, परंतू ते प्रत्यक्षात कधी येणार, समाजातील गरजूंसाठी आपण काही करतो का, आपल्या स्वत:च्या पदराला किती खार लावतो, असे सवाल करून पणशीकर म्हणाले की, समाजाचा उद्धार होण्यासाठी प्रत्येकाने डोळस होण्याची आवश्यकता आहे.
पणशीकर यांच्या मनोगतानंतर ‘वारी-एक प्रवासानुभूती’ या कार्यक्रमास सुरुवात झाली. दोन मित्रांच्या संवादातून वारीतील दैनंदिन कार्यक्रम आणि वारीचा सर्व प्रवास उलगडत गेला व त्यातून उपस्थित श्रोत्यांना प्रत्यक्ष थेट वारीच अनुभवायला मिळाली.
आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने वारीचा हा सोहळा सुरू झाला. वाटेतील या प्रवासात अन्य काही संतांच्या पालख्या त्यात सहभागी झाल्या. हैबतबाबा हे वारीचे जनक मानण्यात येतात. १८३२ मध्ये त्यांनी आखून दिलेल्या नियमानुसारच आजही संपूर्ण वारी पार पडते. वारीमध्ये ३०० ते ४०० िदडय़ा सहभागी असतात. सुरुवातीला मानाच्या २६ िदडय़ा सहभागी असतात. वारीत दररोज भजन, किर्तन, हरीपाठ आदी कार्यक्रम होतात अशी माहिती कार्यक्रमातून मिळाली.
‘रामकृष्ण हरी’ च्या गजरात वारीच्या सोहळ्यास सुरुवात झाली आणि ‘रुप पाहता लोचनी’ असा अभंग सुरू झाला. वारीतील मनोरे, पावल्या आदी पारंपरिक खेळ, भजनाचे प्रकार, समाज आरतीही या वेळी सादर करण्यात आली. वारीच्या प्रवासात भेटणारे वासुदेव, ज्योतिषी, न्हावी, पोतराज ही पात्रेही रंगमंचावर येऊन गेली. त्यांनी संत एकनाथ महाराज, संत सेना न्हावी यांनी रचलेले भारुड, अभंग सादर करून उपस्थितांना वारीतच असल्याचा अनुभव दिला.
व्यासपीठावर लावलेल्या मोठय़ा पडद्यावर प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीतील दृश्ये दाखविण्यात येत होती. यात दिवेघाटातील वारीचे मार्गक्रमण, जेजुरी आणि लोणंद येथील िरगण, वाखरीचे शेवटचे रिंगण आणि शेवटी ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे’अशा पंढरीरायाचे दर्शन आणि त्याची पूजा याचेही दर्शन घडविण्यात आले आणि वारीचा हा सोहळा आपल्या डोळ्यात व मनात साठवत श्रोते विठ्ठलमय होऊनच मार्गस्थ जाहले..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment