विद्यार्थ्यांनी गिरवले पुस्तकातील विज्ञानाचे धडे!
प्रतिनिधी
विज्ञानातील धडे हे केवळ विज्ञानाच्या पुस्तकापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या यंदाच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सहावी आणि नववीचे ३३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे यंदाचे २७ वे वर्ष होते.
स्वयंसेवेतून विद्यार्थ्यांना समस्या जाणून घेता येतात आणि त्यातून विज्ञानाचे वेगळ्या प्रकारे ज्ञान मिळते. हे ज्ञान केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेले असल्याने तसेच या प्रकल्पात पालकांचाही सहभाग असल्याने त्या विद्यार्थ्यांसह अवघे कुटुंब विज्ञानमय होऊन जाते. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दैनंदिन वापरातील रसायनांचे घातक परिणाम’ असा विषय देण्यात आला होता. आपण आपल्या घरात विविध रसायनांच्या आणि पदार्थाच्या माध्यमातून हे घातर रासयनिक पदार्थ आपल्या घरी आणत असतो. मात्र ते टाळणे आपल्याच हातात असते, हे यातून मुलांच्या मनावर िबबवायचे होते.
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून ३१ जणांची सुवर्ण तर २४० जणांची रजत पदकासाठी निवड करण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते परळ येथील दामोदर नाटय़गृहात पार पडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. फोंडके म्हणाले की, विज्ञानामुळे केवळ व्यक्तिमत्व विकासच नव्हे तर देशसेवेचेही समाधान मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी विज्ञानात न रमता तेच विज्ञान आपल्याला दैनंदिन जीवनात कसे आत्मसात करता येईल आणि त्यातून आपल्याला आणि इतरांनाही कसा आनंद मिळेलयाचा प्रयत्न करावा.मंडळातर्फे इतकी मोठी स्पर्धा दरवर्षी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय कार्यकर्त्यांच्या मदतीने घेण्यात येत
आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment